मुंबई (प्रतिनिधी): आयपीएलच्या आगामी हंगामामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्यांच्या मुख्य खेळाडूंना पुढील हंगामासाठी मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये परत आणण्याची इच्छा आहे. त्यात अष्टपैलू हार्दिक आणि कृणाल पंड्या बंधूंसह कीरॉन पोलार्ड तसेच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराला पसंती दर्शवली आहे.
आयपीएलचा यंदाचा हंगाम पाच वेळा जेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वोत्तम नव्हता. असे असले तरी हा संघ लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्मा २०११ मध्ये जोडला गेला. २०१३ मध्ये, त्याने मधल्या हंगामापासून कर्णधारपद स्वीकारले आणि त्याच वर्षी संघाला चॅम्पियन बनवले. गेल्या दोन हंगामांमध्ये विजय मिळवल्यानंतर मुंबई या वेळी प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकली नाही.
आयपीएल २०२२मध्ये सर्व संघात नवीन खेळाडूंची भरणा होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये प्रत्येक संघाला दोन किंवा तीन खेळा़डूंना कायम ठेवता (रिटेन) येईल. त्यामुळे प्रमुख क्रिकेटपटूंना कायम ठेवण्यासाठी प्रत्येक फ्रँचायझी उत्सुक आहे. दोन नवीन संघ स्पर्धेत प्रवेश करत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नवीन फ्रँचायझींना लिलावात दर्जेदार खेळाडू निवडण्याची उज्ज्वल संधी देण्यासाठी कठोर रिटेन्शन पॉलिसी लागू करू शकते. अशा परिस्थितीत दोन नवीन संघांना लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवड करण्याची संधी असेल.
सध्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत आहे. विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची स्पर्धा असल्याने रोहित टी-२० मध्ये भारताचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.
झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…
जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…
ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…
AI च्या किमयेने कट रचला आणि मैत्रिणीने चुना लावला मुंबई : हल्ली एआय तंत्रज्ञानामुळे (AI…
प्रवाशांनी सावध राहण्याचे पुणे पोलिसांचे आवाहन पुणे : पुण्यातील धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच असून रोज…
म्हणाले, तू सर्व आयसीसी व्हाईट बॉल ट्रॉफी तर जिंकल्यास, पण... मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने…