'राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन'

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ड्रग्जची तस्करीही करत असल्याचे धक्कादायक वक्तव्य कनार्टकमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी केले. कुमार कटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये राजकारण पेटलं असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.


'राहुल गांधी कोण आहेत? मी हे सांगत नाही. राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून ते ड्रग्जची तस्करीही करतात. हे माध्यमांत आलं होते. तुम्ही साधा पक्षही चालवू शकत नाही,' असे नलीन कुमार कटील यांनी म्हटले आहे.


काँग्रेसनेही पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अशिक्षित असा केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात आता नलीन कुमार कटील यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते डी. शिवकुमार यांनी 'आपण राजकारणात विरोधकांसोबतही आदराने वागले पाहिजे असे मी काल म्हटले होते. भाजप माझ्यासोबत सहमत असेल आणि त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यासाठी माफी मागले अशी अपेक्षा करतो.' असे ट्विट करत नलीन कुमार कटील यांना राहुल गांधींची माफी मागण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh: अनुपपूरमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका

Uttar Pradesh: मेड असल्याचे सांगत महिलेने केले घर साफ; स्त्रीला बेशुद्ध करून...

उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडातील एका सोसायटीत वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्या घरात चोरी करण्यात आली.

Iranian crude oil : इराणी कच्च्या तेलाचा कार्गो चीनकडे वळवला गेल्याच्या बातम्या तथ्यात्मकदृष्ट्या चुकीच्या, सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इराणी कच्च्या तेलाचा एक कार्गो पेमेंटशी संबंधित अडचणींमुळे गुजरातमधील वाडीनार

Green Sanvi Vessel: ग्रीन सान्वी जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आणत असलेला एलपीजी गॅस किती दिवस पुरेल?

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील पुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

बाजारात बनावट आंब्यांचा सुळसुळाट; तब्बल २०० किलो बनावट आंबे जप्त

हैद्राबाद : उन्हाळा सुरु झाला की स्वागत केलं जात ते फळांचा राजा आंब्याचं, कारण वर्षभरातून फक्त उन्हळ्यातच

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम