ड्रोन्ससह अत्याधुनिक यंत्रणा चीनला प्रत्युत्तर देणार

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. भारताच्या सीमाभागात चीनकडून हालचाली वाढल्यामुळे भारतीय लष्कर चीनी लष्कराच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे इस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे.


चीनच्या सीमालगत चीनी सैन्याने गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. तसेच सैन्याच्या विविध तुकड्यांचा सरावदेखील सीमाभागात वाढला आहे. त्यामुळे चीन पुन्हा भारतावर संर्घष करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडूनही चीनविरोधात कारवाईची तयारी करण्यात आली असल्याची माहिती, कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.



हे सुद्धा वाचा - भारत ‘जशास तसं उत्तर’ देण्यास सज्ज!


चीन लष्कर, वायूदलात सैन्यांची वाढ करत बऱ्याच काळापासून सीमाभागात तुकड्यांचा सराव करत आहेत. तसेच चीनकडून गस्तींचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडने पूर्ण तयारी केली असून संर्घषाला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचे कमांडर पांडे म्हणाले.


भारतीय लष्करानेही नियंत्रण रेषेजवळ गस्ती वाढवल्या आहेत. तसेच भारताकडे हिंसाचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेसे सैन्यबळही उपलब्ध आहे. गस्तीसाठी सर्वेलन्स ड्रोन्सचा वापर करण्यात आला असून अत्याधुनिक रडार यंत्रणा, संपर्क यंत्रणा आणि नाईट विझिबिलिटीसाठीची सामग्री भारताकडे उपलब्ध आहे, असे कमांडर मनोज पांडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

हिमाचल हादरलं! सोलनमध्ये स्फोट; पोलीस स्टेशनजवळ घडली घटना

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलन जिल्ह्यातील नालागढ पोलीस स्टेशनच्या

महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६)

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६; देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणार

मुंबई : देशाच्या राजकीय आणि आर्थिक हालचालींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं संसदचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय

जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा