ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

डहाणू-कासा (वार्ताहर) : परतीच्या पावसाने उघडीप घेतल्याने मागील काही दिवसांपासून डहाणू, तलासरी, विक्रमगड, पालघर, आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. तथापि, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. परिणामी, भात कापावे किंवा आणखी काही दिवस वाट पाहावी, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.


शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेत भातशेती केली आहे. दरम्यान, ती कापणीला आली असताना परतीच्या पावसानी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरीही सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताचे दाणे पूर्णपणे भरले गेले नाहीत. सततच्या पावसाने अनेक रोपांवरील फुले खाली पडली. तसेच, जी फुले दाण्यात रूपांतरीत होण्यास सुरुवात झाली, त्यांच्यातही पावसामुळे भात तयार होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले भातपीक तयारच झाले नाही.


दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या शेतात थोडफार पीक आले होते. तेही परतीच्या पावसाने संपूर्ण पीक आडवे केले आहे. त्यामुळे भात दाणे भिजून त्याला मोड (कोंब) आले होते. तरीही निसर्गाच्या संकटापुढे न झुकता हातात आलेले व उरले-सुरले पीक शेतातून काढून घेण्यास बळीराजा कामाला लागला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून आकाशात पुन्हा ढग जमा होत असून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत अजून भर पडत आहे. जेमतेम आलेले पीक पुन्हा पाऊस आला तर तेही वाया जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्याला रोज सतावत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कापलेले भात पीक व्यवस्थितपणे सुकत नसल्याने दोन ते तीन दिवस कापलेले भात पीक शेतातच ठेवावे लागत आहे.



पीक ओले राहण्याची भीती


कापलेले भातपीक नीट कोरडे झाले नाही तर त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भात कापल्यानंतरही ते नीटपणे कोरडे करणे आवश्यक असते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कापलेले भातपीक व्यवस्थित कोरडे होत नसल्याने ते ओले राहून नुकसान होण्याची शक्यता बळावत आहे.

Comments
Add Comment

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य