ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

Share

डहाणू-कासा (वार्ताहर) : परतीच्या पावसाने उघडीप घेतल्याने मागील काही दिवसांपासून डहाणू, तलासरी, विक्रमगड, पालघर, आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. भात कापणीच्या कामाला वेग आला आहे. तथापि, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. परिणामी, भात कापावे किंवा आणखी काही दिवस वाट पाहावी, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत घेत भातशेती केली आहे. दरम्यान, ती कापणीला आली असताना परतीच्या पावसानी भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरीही सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताचे दाणे पूर्णपणे भरले गेले नाहीत. सततच्या पावसाने अनेक रोपांवरील फुले खाली पडली. तसेच, जी फुले दाण्यात रूपांतरीत होण्यास सुरुवात झाली, त्यांच्यातही पावसामुळे भात तयार होण्यास अडचण निर्माण झाली. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले भातपीक तयारच झाले नाही.

दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या शेतात थोडफार पीक आले होते. तेही परतीच्या पावसाने संपूर्ण पीक आडवे केले आहे. त्यामुळे भात दाणे भिजून त्याला मोड (कोंब) आले होते. तरीही निसर्गाच्या संकटापुढे न झुकता हातात आलेले व उरले-सुरले पीक शेतातून काढून घेण्यास बळीराजा कामाला लागला आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून आकाशात पुन्हा ढग जमा होत असून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत अजून भर पडत आहे. जेमतेम आलेले पीक पुन्हा पाऊस आला तर तेही वाया जाते की काय, अशी चिंता शेतकऱ्याला रोज सतावत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कापलेले भात पीक व्यवस्थितपणे सुकत नसल्याने दोन ते तीन दिवस कापलेले भात पीक शेतातच ठेवावे लागत आहे.

पीक ओले राहण्याची भीती

कापलेले भातपीक नीट कोरडे झाले नाही तर त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे भात कापल्यानंतरही ते नीटपणे कोरडे करणे आवश्यक असते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे कापलेले भातपीक व्यवस्थित कोरडे होत नसल्याने ते ओले राहून नुकसान होण्याची शक्यता बळावत आहे.

Recent Posts

Central Railway Platform Ticket : मध्य रेल्वेकडून फलाट तिकीट विक्रीवर १५ मेपर्यंत निर्बंध!

मुंबई  : शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असून अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. परिणामी, नियमित…

4 minutes ago

Electric Vehicles : महाराष्ट्र दिनापासून इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

मुंबई  : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि…

11 minutes ago

वेळेच्या नियोजनासाठी घड्याळाची गरज

रवींद्र तांबे जीवनात जे वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत ते जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.…

24 minutes ago

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली…

27 minutes ago

MP Narayan Rane : ‘बेस्ट’ वाचवण्यासाठी मा.खा. नारायण राणेंचा पुढाकार

मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला संबोधले जात असले तरी रेल्वेखालोखाल बेस्ट उपक्रमाच्या बसेसना जीवनवाहिनीचा मान दिला जातो.…

29 minutes ago

ड्रोन कॅमेऱ्याने सुसज्ज दीदी

रियास बाबू टी नोव्हेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दीनदयाळ अंत्योदय…

32 minutes ago