'पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्या...'

मुंबई : पाकिस्तानने पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्या, नाही तर पाकसोबत एकदा आरपारची लढाई करावी लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.



हे सुद्धा वाचा - भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला


'भारताच्या जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेक भारतीय व्यवसाय करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये जातात. परंतु दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांना मारले जात आहे. पाकिस्तानने हल्ले थांबविले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. पाकने दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात दिला पाहिजे अन्यथा पाकसोबत आरपारची लढाई करावी लागेल. पाकिस्तानचे फार लाड करून चालणार नाही,' असे रामदास आठवले म्हणाले.



भारत-पाक क्रिकेट सामन्याला आठवल्यांचा विरोध


'भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा. पाकिस्तान भारतावर अनेक हल्ले करत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये परंतु अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान सामने न होणे योग्य आहे. त्यामुळे मी जय शहा यांना सांगेल की, पाकिस्तान संघासोबत खेळू नये,' असेही आठवले म्हणाले.


Comments
Add Comment

Indigo Flight Cancellations : इंडिगोच्या गोंधळामुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, असे करा प्रवासाचे नियोजन किंवा मिळवा रिफंड

मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द

एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलली; आयोगाने जाहीर केल्या नव्या तारखा

मुंबई : एमपीएससीची २१ डिसेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आयोगाने नव्या तारखा जाहीर करून

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची