'पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्या...'

मुंबई : पाकिस्तानने पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्या, नाही तर पाकसोबत एकदा आरपारची लढाई करावी लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.



हे सुद्धा वाचा - भाजपाने राज ठाकरेंच्या नादी न लागण्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला


'भारताच्या जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेक भारतीय व्यवसाय करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये जातात. परंतु दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्यांना मारले जात आहे. पाकिस्तानने हल्ले थांबविले नाही तर पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. पाकने दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात दिला पाहिजे अन्यथा पाकसोबत आरपारची लढाई करावी लागेल. पाकिस्तानचे फार लाड करून चालणार नाही,' असे रामदास आठवले म्हणाले.



भारत-पाक क्रिकेट सामन्याला आठवल्यांचा विरोध


'भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा. पाकिस्तान भारतावर अनेक हल्ले करत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये परंतु अशा परिस्थितीत भारत पाकिस्तान सामने न होणे योग्य आहे. त्यामुळे मी जय शहा यांना सांगेल की, पाकिस्तान संघासोबत खेळू नये,' असेही आठवले म्हणाले.


Comments
Add Comment

महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

कुर्ला येथील विविध परिसरातील ७१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन

अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’

Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री

Mumbai Western Express Highway | कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग

मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून