इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

विजय मांडे


कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा हताश सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.


कोरोना महामारीमुळे दीड ते दोन वर्षे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर, अनेकांचे व्यवसाय-धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे. इंधनाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. त्यातच आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे.


भाजीपाल्याचे दर वाढल्याने मटार- २०० रुपये किलो, फ्लॉवर - ८० रुपये किलो, कोबी - ४० रुपये किलो, टमाटर - ६० रुपये किलो, घेवडा - ७० रुपये किलो, काकडी - ५० रुपये किलो, गवार - ८० रुपये किलो, मिरची - ६० रुपये किलो, वांगी - ८० रुपये किलो, भेंडी - ६० रुपये किलो, फरसबी - ६० रुपये किलो, लालभोपळा - ५० रुपये किलो, तोतापुरी आंबा - १५० रुपये किलो, राजमा - १२० रुपये किलो, तोंडली - ६० रुपये किलो, सुरण - ६० रुपये किलो, काकडी - ४० रुपये किलो, बिट - ४० रुपये किलो, गाजर - ६० रुपये किलो, सिमला मिरची - ७० रुपये किलो, शेवगा शेंगा - १२० रुपये किलो, आले - ६० रुपये किलो, कांदा - ५० रुपये किलो, बटाटा - २० रुपये किलो, मशरुम - २०० रुपये किलो, तर पालेभाजींमध्ये मेथी - ३० रुपये जुडी, कांद्याची पात - ३० रुपये, शेपू - २० रुपये, मुळा - २० रुपये, कोथिंबीर - ६० रुपये जुडी झाली आहे.



भाव का वाढले?


या भाववाढीबद्दल अनेक वर्षांपासून कर्जत बाजारपेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. होलसेल बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.


भाजीपाला ही रोज लागणारी वस्तू आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे भाववाढीमुळे मोडले आहे. - सुनिल ठोंबरे, ग्राहक

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले