इंधनानंतर भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला

विजय मांडे


कर्जत : इंधनाच्या दरांनी शंभरी पार केली आहे. त्यातच भर म्हणून सर्वसामान्य तथा श्रीमंतांना लागणारी रोजची आवश्यक गोष्ट म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा हताश सवाल सर्वसामान्य विचारत आहेत.


कोरोना महामारीमुळे दीड ते दोन वर्षे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली तर, अनेकांचे व्यवसाय-धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस हजारी गाठण्याच्या स्थितीत आहे. इंधनाच्या भाववाढीचा भडका उडाला आहे. त्यातच आता रोजच्या जीवनात लागणाऱ्या भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले असून या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे.


भाजीपाल्याचे दर वाढल्याने मटार- २०० रुपये किलो, फ्लॉवर - ८० रुपये किलो, कोबी - ४० रुपये किलो, टमाटर - ६० रुपये किलो, घेवडा - ७० रुपये किलो, काकडी - ५० रुपये किलो, गवार - ८० रुपये किलो, मिरची - ६० रुपये किलो, वांगी - ८० रुपये किलो, भेंडी - ६० रुपये किलो, फरसबी - ६० रुपये किलो, लालभोपळा - ५० रुपये किलो, तोतापुरी आंबा - १५० रुपये किलो, राजमा - १२० रुपये किलो, तोंडली - ६० रुपये किलो, सुरण - ६० रुपये किलो, काकडी - ४० रुपये किलो, बिट - ४० रुपये किलो, गाजर - ६० रुपये किलो, सिमला मिरची - ७० रुपये किलो, शेवगा शेंगा - १२० रुपये किलो, आले - ६० रुपये किलो, कांदा - ५० रुपये किलो, बटाटा - २० रुपये किलो, मशरुम - २०० रुपये किलो, तर पालेभाजींमध्ये मेथी - ३० रुपये जुडी, कांद्याची पात - ३० रुपये, शेपू - २० रुपये, मुळा - २० रुपये, कोथिंबीर - ६० रुपये जुडी झाली आहे.



भाव का वाढले?


या भाववाढीबद्दल अनेक वर्षांपासून कर्जत बाजारपेठेत भाजी विक्री करणारे शिवनारायण लोदी यांनी सांगितले की, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. होलसेल बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत.


भाजीपाला ही रोज लागणारी वस्तू आहे. भाजीपाल्याचे भाव वाढले तरी खरेदी करावीच लागते. मात्र सर्वसामान्यांचे कंबरडे भाववाढीमुळे मोडले आहे. - सुनिल ठोंबरे, ग्राहक

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक