पाणीटंचाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक

ठाणे (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून कळवा-मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. चार-चार दिवस पाणी नसतानाच दूषित पाण्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दूषित पाण्यासह थेट पालिका आयुक्तांचे दालन गाठून ठिय्या आंदोलन केले.


तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ठाणे शहरासह राज्यभर शाळा सुरु झालेल्या असतानाही प्रत्यक्ष महासभा घेतली जात नाही. ठाणेकरांचे प्रश्न सभागृहात मांडले जाऊ नयेत, यासाठीच प्रत्यक्ष महासभा होत नसल्याचा आरोप करीत ठाणे पालिकेच्या महासभेतच कोरोना येतो का?, असा सवालही यावेळी पठाण यांनी केला.


सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु ते सुरू असताना वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपात निर्माण झाली आहे. याच पाण्याच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतरही या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.


दरम्यान, पाण्याच्या याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाण्याची टंचाई असलेल्या भागाची पाहणी करुन दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचे प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक