भारत 'जशास तसं उत्तर' देण्यास सज्ज!


त्रिशूल, वज्रसारखी पौराणिक शस्त्रांची निर्मिती




नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षात चीन सैनिकांनी वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांचा उद्देश केवळ सैनिकांना गंभीर जखमी करण्याचा असतो. त्यामुळे चीनच्या धूर्त वागणूकीस भारत आता जशास तसे उत्तर देणार आहे. भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत वज्र, त्रिशूल यांसारखी अनेक शस्त्रे तयार केली आहेत. या नव्या शस्त्रांमुळे भारतीय जवानांना शत्रूंशी लढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या शस्त्रांना वज्र, त्रिशूल हेच नाव देण्यात आले आहे.


वज्र, त्रिशूल या शस्त्रांचा वापर करून भारतीय सैनिक चीनच्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करू शकतील, अशी माहिती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अॅपस्ट्रोन कंपनीने दिली आहे. 'गलवान खोऱ्यात चीन सैनिकांनी तारांचे आवरण असलेल्या काठ्या आणि टेसर्स या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. त्यामुळे सुरक्षा दलांनी अशाप्रकारचे जीव घेणार नाही परंतु शत्रूला चोख उत्तर देईल, अशा शस्त्रांची निर्मिती करण्यास सांगितली. त्यानंतर भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत ही नवी शस्त्रे बनवली. भारताची नवी शस्त्रे चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक असल्याचे,' अपॅस्ट्रोन कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार म्हणाले.


वज्र नावाने खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. खिळ्यांचा वापर केल्यामुळे शत्रूवर आक्रमक हल्ला आणि बुलेट प्रुफ वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी मोठा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही