भारत 'जशास तसं उत्तर' देण्यास सज्ज!


त्रिशूल, वज्रसारखी पौराणिक शस्त्रांची निर्मिती




नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षात चीन सैनिकांनी वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांचा उद्देश केवळ सैनिकांना गंभीर जखमी करण्याचा असतो. त्यामुळे चीनच्या धूर्त वागणूकीस भारत आता जशास तसे उत्तर देणार आहे. भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत वज्र, त्रिशूल यांसारखी अनेक शस्त्रे तयार केली आहेत. या नव्या शस्त्रांमुळे भारतीय जवानांना शत्रूंशी लढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या शस्त्रांना वज्र, त्रिशूल हेच नाव देण्यात आले आहे.


वज्र, त्रिशूल या शस्त्रांचा वापर करून भारतीय सैनिक चीनच्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करू शकतील, अशी माहिती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अॅपस्ट्रोन कंपनीने दिली आहे. 'गलवान खोऱ्यात चीन सैनिकांनी तारांचे आवरण असलेल्या काठ्या आणि टेसर्स या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. त्यामुळे सुरक्षा दलांनी अशाप्रकारचे जीव घेणार नाही परंतु शत्रूला चोख उत्तर देईल, अशा शस्त्रांची निर्मिती करण्यास सांगितली. त्यानंतर भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत ही नवी शस्त्रे बनवली. भारताची नवी शस्त्रे चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक असल्याचे,' अपॅस्ट्रोन कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार म्हणाले.


वज्र नावाने खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. खिळ्यांचा वापर केल्यामुळे शत्रूवर आक्रमक हल्ला आणि बुलेट प्रुफ वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी मोठा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

'तेल खरेदीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही'

रशियाकडून खरेदीबाबत भारत ठाम नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जिथे मिळेल तिथून कमीत कमी किमतीत तेल खरेदी करेल.

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण