भारत 'जशास तसं उत्तर' देण्यास सज्ज!

  113


त्रिशूल, वज्रसारखी पौराणिक शस्त्रांची निर्मिती




नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षात चीन सैनिकांनी वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. या शस्त्रांचा उद्देश केवळ सैनिकांना गंभीर जखमी करण्याचा असतो. त्यामुळे चीनच्या धूर्त वागणूकीस भारत आता जशास तसे उत्तर देणार आहे. भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत वज्र, त्रिशूल यांसारखी अनेक शस्त्रे तयार केली आहेत. या नव्या शस्त्रांमुळे भारतीय जवानांना शत्रूंशी लढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या शस्त्रांना वज्र, त्रिशूल हेच नाव देण्यात आले आहे.


वज्र, त्रिशूल या शस्त्रांचा वापर करून भारतीय सैनिक चीनच्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करू शकतील, अशी माहिती शस्त्र निर्मिती करणाऱ्या अॅपस्ट्रोन कंपनीने दिली आहे. 'गलवान खोऱ्यात चीन सैनिकांनी तारांचे आवरण असलेल्या काठ्या आणि टेसर्स या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. त्यामुळे सुरक्षा दलांनी अशाप्रकारचे जीव घेणार नाही परंतु शत्रूला चोख उत्तर देईल, अशा शस्त्रांची निर्मिती करण्यास सांगितली. त्यानंतर भारताने पारंपारिक शस्त्रांकडून प्रेरणा घेत ही नवी शस्त्रे बनवली. भारताची नवी शस्त्रे चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक असल्याचे,' अपॅस्ट्रोन कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मोहित कुमार म्हणाले.


वज्र नावाने खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. खिळ्यांचा वापर केल्यामुळे शत्रूवर आक्रमक हल्ला आणि बुलेट प्रुफ वाहनांचे टायर पंक्चर करण्यासाठी मोठा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने