फोटोशूटमुळे वसईच्या किनाऱ्यावर कचरा व प्रदूषणात वाढ

कीर्ती केसरकर


नालासोपारा : वसई-विरारमधील समुद्रकिनारे विविध फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहेत; परंतु यामुळे समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. वारंवार फोटोशूटसाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असूनही याठिकाणी फोटोशूट सुरूच आहेत. त्यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा त्रास होत आहे.


वसई-विरारमधील समुद्रकिनारे निसर्गरम्य आणि शांत असल्याने याठिकाणी विविध शहरांतील नागरिक फोटोशूटसाठी येत असतात. लग्नसोहळा, चित्रपट, मॉडेल अशा फोटोशूटसाठी भुईगाव, राजोडी, कळंब, नावापूर हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. तसेच, या समुद्रकिनाऱ्यांकडे कोणाचेही फारसे लक्ष नसल्याने फोटोशूट दरम्यान अडवणुकीची भीती नसते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी फोटोशूटमुळे होणारा कचरा व प्रदूषणाचे वाढत्या प्रमाणामुळे त्यावर प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर कोविडच्या काळात सगळे काही बंद असल्यामुळे फोटोशूट करण्यावरसुद्धा बंदी होती.


दरम्यान, आता कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता येऊ लागल्यानंतर कोणत्याच नियमांचे पालन न करता फोटोग्राफर बिनदिक्कतपणे फोटोशूट करत आहेत. यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा प्रदूषण आणि कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फोटोशूट करत असताना वापरण्यात येणारे रंग, गुलाल, फटाके हे पर्यावरणाला तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. तसेच, यामुळे दमा, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे, फोटो काढत असताना गुलाल हवेत उडवला जातो. यामुळे हवा प्रदूषित होत आहे. समुद्रकिनाऱ्यांवर बिनदिक्कतपणे या सर्व गोष्टींचा वापर होतो. या सर्वांमुळे तयार होणारा कचरा किनाऱ्यांवरच टाकला जातो. त्यामुळे किनाऱ्यावर अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे.



पर्यटकांसह स्थानिकही त्रस्त


हे समुद्रकिनारे फिरण्यासाठीदेखील तितकेच प्रसिद्ध आहेत आणि पर्यटकांना तसेच याठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना या संपूर्ण गोष्टींचा त्रास होतो. तसेच, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला राहती वस्ती, शेती तसेच खाण्या-पिण्याची दुकाने आहेत. त्यामुळे याचा त्रास या दुकानदारांसह तेथे आलेल्या ग्राहकांनाही होतो. दरम्यान, फोटोशूट करत असताना वापरण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित धुरामुळे सर्वाधिक त्रास होत असल्याने रहिवाशांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे

Ek Nath Shinde : कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

पोलीस वसाहत पुनर्विकासासह रखडलेल्या कामांना गती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुर्ला फेस्टिव्हलचे आयोजक आमदार

Maharashtra CM : स्फोटक उद्योग अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडे सुधारणा प्रस्ताव!

 मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे 'स्फोटके नियम 2008'

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई, ५ कोटींचे सोने जप्त; ७ अटकेत

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८