फोटोशूटमुळे वसईच्या किनाऱ्यावर कचरा व प्रदूषणात वाढ

कीर्ती केसरकर


नालासोपारा : वसई-विरारमधील समुद्रकिनारे विविध फोटोशूटसाठी प्रसिद्ध आहेत; परंतु यामुळे समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचे व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. वारंवार फोटोशूटसाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असूनही याठिकाणी फोटोशूट सुरूच आहेत. त्यामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा त्रास होत आहे.


वसई-विरारमधील समुद्रकिनारे निसर्गरम्य आणि शांत असल्याने याठिकाणी विविध शहरांतील नागरिक फोटोशूटसाठी येत असतात. लग्नसोहळा, चित्रपट, मॉडेल अशा फोटोशूटसाठी भुईगाव, राजोडी, कळंब, नावापूर हे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत. तसेच, या समुद्रकिनाऱ्यांकडे कोणाचेही फारसे लक्ष नसल्याने फोटोशूट दरम्यान अडवणुकीची भीती नसते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी फोटोशूटमुळे होणारा कचरा व प्रदूषणाचे वाढत्या प्रमाणामुळे त्यावर प्रशासनातर्फे बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर कोविडच्या काळात सगळे काही बंद असल्यामुळे फोटोशूट करण्यावरसुद्धा बंदी होती.


दरम्यान, आता कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता येऊ लागल्यानंतर कोणत्याच नियमांचे पालन न करता फोटोग्राफर बिनदिक्कतपणे फोटोशूट करत आहेत. यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा प्रदूषण आणि कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. फोटोशूट करत असताना वापरण्यात येणारे रंग, गुलाल, फटाके हे पर्यावरणाला तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. तसेच, यामुळे दमा, डोकेदुखी असे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे, फोटो काढत असताना गुलाल हवेत उडवला जातो. यामुळे हवा प्रदूषित होत आहे. समुद्रकिनाऱ्यांवर बिनदिक्कतपणे या सर्व गोष्टींचा वापर होतो. या सर्वांमुळे तयार होणारा कचरा किनाऱ्यांवरच टाकला जातो. त्यामुळे किनाऱ्यावर अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे.



पर्यटकांसह स्थानिकही त्रस्त


हे समुद्रकिनारे फिरण्यासाठीदेखील तितकेच प्रसिद्ध आहेत आणि पर्यटकांना तसेच याठिकाणी येणाऱ्या लहान मुलांना या संपूर्ण गोष्टींचा त्रास होतो. तसेच, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला राहती वस्ती, शेती तसेच खाण्या-पिण्याची दुकाने आहेत. त्यामुळे याचा त्रास या दुकानदारांसह तेथे आलेल्या ग्राहकांनाही होतो. दरम्यान, फोटोशूट करत असताना वापरण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित धुरामुळे सर्वाधिक त्रास होत असल्याने रहिवाशांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या