नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी संपूर्ण जगच ठप्प झाले होते. इतर देशांप्रमाणे भारतातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. भारत लवकरच १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा गाठणार आहे. या खास क्षणाचे जोरदार सेलिब्रेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. येत्या सोमवारी लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
लसीकरण मोहिमेसाठीचे एक खास गाणे तयार करण्यात आले आहे. देशाने कोरोना लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोसचा पल्ला गाठल्यानंतर रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, विमानतळ, बस स्थानक अशा देशभरातील सार्वजनिक ठिकाणांवर हे खास गाणे ऐकायला मिळणार आहे.
गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले असून ‘टीके से बचा है देश टीके से’, असे गाण्याचे शब्द असून लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या तेल आणि गॅस कंपन्यांनी मिळून या गाण्याची निर्मिती केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ९७ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…