अजित पवारांच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुणे यांचा हिस्सा

सूर्यकांत आसबे


सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याच्याच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांना टीकेचे लक्ष्य केले.


ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवार यांनी माझ्या आरोपांना उत्तर द्यावे असे सांगत याचे आपल्याकडील कागदोपत्री असलेले पुरावे आपण उद्या ईडी आणि उच्च न्यायालय व सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकासह आघाडी सरकारने केलेले भ्रष्टचार हि दरोडेखोरी असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली. शरद पवार आणि कुटुंबियांना किरीट सोमय्यांनी याप्रकरणी चॅलेंज केले आहे. अजित पवार आणि नातेवाईकांवर केलेले आरोप चुकीचे असतील तर सिद्ध करा असे आव्हान सोमय्या यांनी शरद पवार यांना दिले आहे.


अजित पवारांनी बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली..?असा संतप्त सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून १८४ कोटींचे बेइनामी व्यवहार इडीच्या छाप्यात सापडली आहे..शिवाजी व्हेन्चर प्रायवेट लिमिटेड, इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची ? या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी १०० कोटी दिले होते. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला तसा अजित पवार परत करणार आहेत का, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील