अजित पवारांच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुणे यांचा हिस्सा

  76

सूर्यकांत आसबे


सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जरंडेश्वर कारखान्याच्याच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेहुण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप करत भाजपचे माजी खासदार व नेते किरीट सोमय्या यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत शरद पवार आणि अजित पवार यांच्या कुटुंबियांना टीकेचे लक्ष्य केले.


ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवार यांनी माझ्या आरोपांना उत्तर द्यावे असे सांगत याचे आपल्याकडील कागदोपत्री असलेले पुरावे आपण उद्या ईडी आणि उच्च न्यायालय व सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकासह आघाडी सरकारने केलेले भ्रष्टचार हि दरोडेखोरी असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली. शरद पवार आणि कुटुंबियांना किरीट सोमय्यांनी याप्रकरणी चॅलेंज केले आहे. अजित पवार आणि नातेवाईकांवर केलेले आरोप चुकीचे असतील तर सिद्ध करा असे आव्हान सोमय्या यांनी शरद पवार यांना दिले आहे.


अजित पवारांनी बहिणींशी बेईमानी केली की महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी केली..?असा संतप्त सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र परिवाराकडून १८४ कोटींचे बेइनामी व्यवहार इडीच्या छाप्यात सापडली आहे..शिवाजी व्हेन्चर प्रायवेट लिमिटेड, इंडो प्रायवेट लिमिटेड कोणाची ? या दोन्ही कंपन्यांनी अजित पवारांना दहा वर्षांपूर्वी १०० कोटी दिले होते. संजय राऊतांनी चोरीचा माल परत केला तसा अजित पवार परत करणार आहेत का, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक