भारताने कोहलीसाठी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकावा

दुबई (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या आयोजनाखालील संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने विराट कोहलीसाठी जिंकावा, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केली आहे.


विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखालील ट्रॉफी उंचावण्यादृष्टीने प्रत्येक क्रिकेटपटूने प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यातचभारताचे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळले. वर्ल्डकप युएईत होत असल्याने आयपीएलचा फायदा त्यांना होईल. आयपीएलमुळे युएईतील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेणे भारताच्या क्रिकेटपटूंना सोपे होईल, असे रैनाने म्हटले आहे. यंदाच्या वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे.


भारताची बहरलेली आघाडी फळी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाची ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. त्यात उपकर्णधार रोहित शर्माची बॅटिंग निर्णायक ठरेल, असे त्याने म्हटले.

Comments
Add Comment

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी

आयपीएल २०२६: राजस्थाननंतर आरसीबीची विक्री

-१६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली फ्रँचायझी-आदित्य बिर्ला ग्रुपसह चार कंपन्यांनी आरसीबी घेतली

आरसीबीला मोठा धक्का; वेगवान गोलंदाज यश दयाल आयपीएल २०२६ मधून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज यश दयाल वैयक्तिक