दुबई (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या आयोजनाखालील संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने विराट कोहलीसाठी जिंकावा, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केली आहे.
विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखालील ट्रॉफी उंचावण्यादृष्टीने प्रत्येक क्रिकेटपटूने प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यातचभारताचे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळले. वर्ल्डकप युएईत होत असल्याने आयपीएलचा फायदा त्यांना होईल. आयपीएलमुळे युएईतील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेणे भारताच्या क्रिकेटपटूंना सोपे होईल, असे रैनाने म्हटले आहे. यंदाच्या वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे.
भारताची बहरलेली आघाडी फळी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाची ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. त्यात उपकर्णधार रोहित शर्माची बॅटिंग निर्णायक ठरेल, असे त्याने म्हटले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…