Categories: क्रीडा

भारताने कोहलीसाठी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकावा

Share

दुबई (वृत्तसंस्था) : बीसीसीआयच्या आयोजनाखालील संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणारा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारताने विराट कोहलीसाठी जिंकावा, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने व्यक्त केली आहे.

विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा वर्ल्डकप आहे. त्याच्या नेतृत्वाखालील ट्रॉफी उंचावण्यादृष्टीने प्रत्येक क्रिकेटपटूने प्रयत्न करावेत. यंदाच्या वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताचा संघ प्रबळ दावेदार आहे. त्यातचभारताचे सर्वच क्रिकेटपटू आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळले. वर्ल्डकप युएईत होत असल्याने आयपीएलचा फायदा त्यांना होईल. आयपीएलमुळे युएईतील खेळपट्ट्या आणि वातावरणाशी जुळवून घेणे भारताच्या क्रिकेटपटूंना सोपे होईल, असे रैनाने म्हटले आहे. यंदाच्या वर्ल्डकपनंतर टी-ट्वेन्टी प्रकारातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने घेतला आहे.

भारताची बहरलेली आघाडी फळी सांघिक कामगिरी उंचावण्यात मोलाची ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. त्यात उपकर्णधार रोहित शर्माची बॅटिंग निर्णायक ठरेल, असे त्याने म्हटले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago