'ठाकरे सरकारचे अयोग्य व्यवस्थापन कोळसा टंचाईला जबाबदार'

मुंबई : ठाकरे सरकारच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी सरकारवर केला आहे. राज्यातील ऊर्जा मंत्रालयाचा निष्काळजीपणा कोळशाच्या कमतरतेला कारणीभूत आहे, तसेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) कोळसा खाणींशी करार न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे ते म्हणाले.


कोळसा खरेदी न करणे आणि त्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे हे ठाकरे सरकारचे मोठे अपयश असून हा प्रकार दुर्दैवी आहे. तसेच सरकारच्या निष्क्रियतेमुळे माजरी परिसरातील नागलोन येथील डब्ल्यूसीएलचे दोन प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर परिसरातील चिंचोली कोळसा खाणी प्रलंबित असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.


डब्ल्यूसीएलसोबत योग्य वेळी कोळशाचा करार केला असता तर राज्यातील कोळसा संकट टाळता आले असते. महाराष्ट्र सरकार राज्यातील कोळसा उत्पादक खाणींशी करार न करता महागडा कोळसा आयात करत असल्याचा आरोप हंसराज अहिर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे