दिवाळीनंतर लसीच्या एका डोसनंतरही सर्व ठिकाणी प्रवेश!

मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाची एक डोस घेतल्यानंतरही नागरिकांना मॉल, लोकल तसेच इतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्यांचा आढावा घेऊन आरोग्य विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.


कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे राज्यात मंदिरे, थिएटर्स उघडण्यात आली, तसेच शाळा-महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे यापुढेही कोरोनाबाधितांची संख्या कमी असेल आणि आरोग्य सेतू अॅपमध्ये 'सेफ' असे स्टेटस आल्यास नागरिकांना सवलत मिळेल, असे टोपे म्हणाले.



हे सुद्धा वाचा - राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट


राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूदरही कमी झालेला आहे. राज्यात सध्या २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके आहे. राज्यात लसीकरणही मोठ्या वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे टोपेंनी दिवाळीनंतर एक डोस घेऊनही नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष