दिवाळीनंतर लसीच्या एका डोसनंतरही सर्व ठिकाणी प्रवेश!

  99

मुंबई : दिवाळीनंतर कोरोनाची एक डोस घेतल्यानंतरही नागरिकांना मॉल, लोकल तसेच इतर सर्व ठिकाणी प्रवेश मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्यांचा आढावा घेऊन आरोग्य विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार आहेत.


कोरोना रुग्ण संख्येत घट होत असल्यामुळे राज्यात मंदिरे, थिएटर्स उघडण्यात आली, तसेच शाळा-महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे यापुढेही कोरोनाबाधितांची संख्या कमी असेल आणि आरोग्य सेतू अॅपमध्ये 'सेफ' असे स्टेटस आल्यास नागरिकांना सवलत मिळेल, असे टोपे म्हणाले.



हे सुद्धा वाचा - राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट


राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृत्यूदरही कमी झालेला आहे. राज्यात सध्या २९ हजार ६२७ सक्रिय रुग्ण असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचे प्रमाण आता ९७.३८ टक्के इतके आहे. राज्यात लसीकरणही मोठ्या वेगाने होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे टोपेंनी दिवाळीनंतर एक डोस घेऊनही नागरिकांना सर्व ठिकाणी प्रवेश मिळण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली