'स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही सरकार निर्लज्जासारखं वागतयं'

मुंबई : राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षांचा पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. परिक्षेच्या वेळापत्रकानुसार एकाच तारखेला दोन परीक्षांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नियोजन केले आहे. उमेदवारांना निवडलेली केंद्रे न देता लांबचे केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यामुळे विरोधी पक्षनेते भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


पडळकर म्हणाले, 'सरकारने एकाच दिवशी दोन परीक्षा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ठेवल्या आहेत. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षेला सामोरे जाण्याचा अधिकारच नाकारत आहात. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचे सरकार निर्लज्जासारखे वागत आहे.'


https://twitter.com/GopichandP_MLC/status/1449268419782533125?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1449268419782533125%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmla-gopichand-padalkar-criticizes-the-state-government-on-the-issues-of-health-department-examinations-msr-8-2634316%2F

ट्विटरवर व्हिडिओ सामायिक करत पडळकर म्हणाले, 'आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परीक्षा रद्द केली. कोरोना काळातही परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने माघारी फिरवलं. सरकारी परीक्षेत गोंधळ घालायची सरकारला सवयच आहे. तसेच 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सरकारने सहा वेळा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. परंतु, सरकारला कसलेही गांभीर्य नाही. प्रशासन आणि सरकारमध्ये कसलाही ताळमेळ राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील