भारताला आठव्या जेतेपदाची संधी

माले (वृत्तसंस्था): मालदिवची राजधानी माले येथे सुरू असलेल्या ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये शनिवारी (१६ ऑक्टोबर) सात वेळचा विजेता भारताची गाठ नेपाळशी पडेल. या स्पर्धेत अजिंक्य असलेल्या कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील माजी विजेत्यांना आठव्या जेतेपदाची संधी आहे.


पाच देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारताने चारपैकी दोन सामने जिंकताना आठ गुणांसह अव्वल स्थान राखले आहे. भारताला उर्वरित दोन सामन्यांत बरोबरी (ड्रॉ) पाहावी लागली. एकूणच त्यांना हरवण्यात प्रतिस्पर्धी चार संघांना अपयश आले आहे. शेवटच्या साखळी सामन्यात यजमान मालदिवला ३-१ अशा फरकाने हरवत भारताने सातत्य राखले आहे. अंतिम फेरीतील दुसरा संघ असलेल्या नेपाळने चार सामन्यांत दोन विजयांसह ७ गुण मिळवलेत. मात्र, एका सामन्यात ड्रॉ पत्करताना एका सामन्यात पराभव पाहावा लागला आहे.


भारताची भिस्त कर्णधार सुनील छेत्रीवर आहे. बुधवारच्या मालदिवविरुद्धच्या दोन गोलांसह त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलसंख्या ७९वर पोहोचवली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना (७७ गोल) मागे टाकले. छेत्रीसमोर आता अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी (८० गोल) आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना (११५ गोल) मागे टाकण्याचे आव्हान आहे. अंतिम फेरीत सातत्य राखताना भारताला ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेची ट्रॉफी उंचावून देण्यात छेत्रीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.


या स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी भारताला शेवटच्या साखळी सामन्यात मालदीवविरुद्ध विजय अनिवार्य होता. भारताने सुरुवातीपासून मालदीवच्या बचावफळीवर दडपण टाकले. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवला. ३३व्या मिनिटाला मनवीर सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु ही आघाडी काही मिनिटेच टिकली. मध्यंतरापूर्वी अली अश्फाकने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केल्यामुळे मालदीवने सामन्यात बरोबरी साधली. मात्र प्रेरणादायी छेत्रीने पुन्हा एकदा विजयवीरची भूमिका बजावताना नऊ मिनिटांत (६२ आणि ७१वे मिनिट) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिला. यानंतर बचावफळीने उत्कृष्ट खेळ केल्याने भारताने हा सामना जिंकला.


भारताने मालदिवपूर्वी, नेपाळला हरवले आहे. तुलनेत कमी रँकिंग असलेल्या भारताला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर सलग दोन विजय मिळवत दमदार कमबॅक केले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठताना फायनल प्रवेश केला. नेपाळ संघ प्रथमच ‘सॅफ’ फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळत आहे. मात्र, स्पर्धेतील एकूण गोल पाहता त्यांनी भारतावर ६-५ अशी आघाडी घेतली आहे. त्यांची मदार अंजन बिस्तासह सुमन लामा, आयुष घलन आणि मनीष डांगीवर आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट

IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना