छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्या रक्ताचा


निलेश राणे यांचे भावोद्गार




सावंतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आमच्यासाठी रक्ताचा आहे. आम्ही शिवप्रेमी आहोत, महाराज हेच आमचं जग आहे. देवाच्या स्थानी आम्ही महाराजांना बघतो. त्यांचे संस्कार आमच्या रक्तात आहेत. मुघलांसारखे एवढं मोठं संकट अंगावर असताना महाराज उभे ठाकले. तीच ऊर्जा आमच्यात येते त्यामुळेच सत्ता कोणाचीही असो समोर विरोधक कितीही मोठा असो त्याला अंगावर घेण्याची ताकद आमच्यात असते, असे भावोद्गार भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.


सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या शिवउद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.


नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे ही सावंतवाडीकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. या पुढील पिढ्यांना महाराजांचा इतिहास कळावा. ते कसे जगले असतील? कसे लढले असतील? यापासून प्रेरणा घेऊन पुढील पिढी आदर्श घडावी यासाठी महाराजांचा हा पुतळा सावंतवाडीकरांसाठी प्रेरणादायी ठरेल. या पुतळ्याचे भूमिपूजन माझ्या हस्ते होते हे देखील माझे भाग्यच आहे. मला मनापासून जे कार्यक्रम आवडतात त्यापैकी हा एक सोहळा असून मला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.


यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, न.प. गटनेते राजू बेग, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा समिती सभापती उदय नाईक, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली भालेकर, बांदा सरपंच अक्रम खान उपस्थित होते.


‘संजू परब महाराजांचे संस्कार विसरले नाहीत’


संजू परब यांना मी ते नगराध्यक्ष नव्हते तेव्हापासून ओळखतोय. मात्र, नगराध्यक्ष झाल्यानंतर इतक्या कमी वेळात त्यांना प्रशासन समजलं, प्रशासनावर पकड जमवली, शहरात कोट्यवधींची कामे केली. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी हे काम करत असताना नेहमीच राजकारण बाजूला ठेवलं. माझ्या शहराला जी गरज आहे त्यात राजकारण येता कामा नये हे त्यांनी नेहमी पाहिलं. मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम करत असताना संजू परब यांनी महाराजांचे संस्कार कधीही विसरले नाहीत, अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजू परब यांच्या कार्याचा गौरव केला.

Comments
Add Comment

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि