तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात : उद्धव ठाकरे


दसरा मेळाव्यात तेच मुद्दे, तेच विषय




मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर कदाचित आज ना उद्या तुम्ही देखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात. पण तुमच्या नशीबात नव्हते. म्हणून तुम्ही वचन मोडले. मी हे पद स्वीकारले, एका जबाबदारीने स्वीकारले, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही, असे ते म्हणाले.


भाषणातील ठळक मुद्दे -


- सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसे करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरू झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा.


- माझे भाषण कधी थांबते आणि कधी एकदा चिरकतो, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणे, चिरकणे यातूनच त्यांना रोजगार मिळतो.


- भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत.
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला, असा गळा भाजपाचे लोक काढतात. आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?


- महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून होणारी ढवळाढवळ खपवू दिली जाणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढा उभारला पाहिजे. जसे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींने दाखवून दिले, तसे तुम्ही दाखवले पाहिजे.


- महिलांवरी अत्याचार हे देशभर वाढत आहेत. विधानसभेचे अधिवेशन कशाला. आपण मोदीजींना सांगा आणि संसदेचे अधिवेशन आठवडाभर घ्या.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती