तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात : उद्धव ठाकरे


दसरा मेळाव्यात तेच मुद्दे, तेच विषय




मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर कदाचित आज ना उद्या तुम्ही देखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असतात. पण तुमच्या नशीबात नव्हते. म्हणून तुम्ही वचन मोडले. मी हे पद स्वीकारले, एका जबाबदारीने स्वीकारले, असे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. स्वतःच्या अंगात हिंमत असेल तर समोरुन लढा द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचे हे मर्दाचे लक्षण नाही, असे ते म्हणाले.


भाषणातील ठळक मुद्दे -


- सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसे करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरू झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा.


- माझे भाषण कधी थांबते आणि कधी एकदा चिरकतो, अशी काहींची अवस्था आहे. कारण शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर टीका करणे, चिरकणे यातूनच त्यांना रोजगार मिळतो.


- भाजप देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत.
महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाला, असा गळा भाजपाचे लोक काढतात. आहेत. मग उत्तर प्रदेशात लोकशाहीचा मळा फुललाय का?


- महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून होणारी ढवळाढवळ खपवू दिली जाणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र होऊन लढा उभारला पाहिजे. जसे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींने दाखवून दिले, तसे तुम्ही दाखवले पाहिजे.


- महिलांवरी अत्याचार हे देशभर वाढत आहेत. विधानसभेचे अधिवेशन कशाला. आपण मोदीजींना सांगा आणि संसदेचे अधिवेशन आठवडाभर घ्या.

Comments
Add Comment

Megha Dhade : उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन...महेश कोठारेंच्या 'मोदी भक्ती'वर टीका करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीचा सणसणीत प्रत्युत्तर!

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिवाळी पाहाट कार्यक्रमादरम्यान “मी भाजप भक्त आहे, मी

Chitra Wagh : 'देवाभाऊ'मुळे ठाकरे एकत्र! प्रसाद लाड यांना ओवाळल्यानंतर चित्रा वाघ यांचे थेट ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राजकीय टिप्पणी

मुंबई : राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या व्यक्तींचेही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे भावनिक नातेसंबंध जपलेले असतात.

ऐरोली पुलावर बेस्ट बस-टेम्पोची धडक; ७ प्रवासी जखमी

मुंबई: ऐरोली पुलावर आज, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी १०:०५ वाजता बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या

Mumbai Fire News : जोगेश्वरीतील 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर'ला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 'लेव्हल-२' घोषित, पण मोठी दुर्घटना टळली

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम (Jogeshwari West) परिसरात आज, गुरुवारी सकाळी 'जे. एन. एस. बिझनेस सेंटर' या उंच इमारतीला भीषण

भाऊबीज : भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण

मुंबई: भाऊबीज हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेम, आपुलकी आणि

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; सुमारे १९.७८ कोटींचे 'हायड्रोपोनिक वीड' जप्त, तिघांना अटक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA), मुंबई कस्टम्स झोन-III च्या अधिकाऱ्यांनी २० आणि २१ ऑक्टोबर