दसरा असूनही बाजारामध्ये शुकशुकाट

  127

नालासोपारा (वार्ताहर) : दसरा असूनही वसई-विरारमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामुळे नागरिकांना पूर्वीसारखा महागाईचा सामना करता येत नाही. त्यातही फुले आणि फळांचे दर वाढल्याने नागरिकांना खरेदी करणे कठीण जात होते. दरम्यान, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने फेरीवालेसुद्धा निराश होते.


दरवर्षी दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. वसई-विरार स्थानकाबाहेर फूल विक्रेता व फळ विक्रेत्यांची रांग लागलेली असते. यंदाही फेरीवाल्यांनी समान विकण्याची संपूर्ण तयारी केली होती; परंतु नागरिकांचा खरेदीला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाचा काळ असताना अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामध्येच नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक टंचाईमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर फुलांचे दर हे ७० आणि ८० रुपये झाले आहेत. फळेही शंभर रुपये किलोने मिळू लागल्याने नागरिक सध्या हैराण झालेले आहेत. महागाईचे सावट असल्याने तसंच नोकरी धंदा नसून आर्थिक टंचाई असल्याने बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळाली. ग्राहकांची गर्दी नसल्याने अपेक्षित धंदा न झाल्याने फेरीवालेदेखील निराश होते.


दसऱ्याच्या दिवशी फुलांची आणि फळांची चांगली विक्री होईल, अशी आशा होती. पण तसे झाले नाही. दोन दिवस आधी सामान भरण्यास सुरुवात केली, तरी नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. - गोपी मारू, फूल विक्रेता


दसऱ्याला चार हजारांपर्यंतच विक्री होते; परंतु, यंदा विक्रीत घट झाली. ग्राहकांनी महागाईचे कारण देऊन कमी सामान घेतले. त्यामुळे धंदा झाला नाही. - अश्विनी बोबडे, फेरीवाले

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.