कर्जत कृषी विभागाच्या बियाणांमध्ये भेसळ

विजय मांडे


कर्जत : कर्जत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बियाणात भेसळ आढळून आली आहे. याचा परिणाम शेतात वेगवेगळ्या जातीच्या बियाणाचे पीक उगवलेले शेतकऱ्यांना दिसत असल्याने यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे येथील प्रगत शेतकरी शशिकांत मोहिते सांगत आहेत.


कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भात पिकाची लागवड करून भात पीक पिकवत आहेत. त्यातच भात पिकाच्या वेगवेगळ्या जातीचे पीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना प्रस्ताहन करून पुढाकार घेतला जात आहे. सध्या मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात तांबूस कलरच्या भात पिकाची लागवड करून शेतकरी भात पिकवत आहेत. या भाताला दिडशे रुपये प्रति किलो भाव मिळत असून पिकांचे उत्पन्न देखील वाढलेले आहे.


परिणामी कर्जत कृषी विभागाकडून या पिकाच्या लागवडी साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यात आले असून या पिकाची लागवडी साठी शेतकऱ्यांना काही अटी शर्तीवर पीक लागवडी साठी बियाणे मोफत देण्यात आले होते. आता ज्या शेतकऱ्यांना कर्जत कृषी विभागाकडून हे बियाणे लागवडी साठी देण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांनी या बियाणांच्या भात पिकाची मोठ्या क्षेत्रफळावर शेतात लागवड करून पीक पिकवले आहे. मात्र आता पीक कापणीवर आले असून यात मोठया प्रमाणात भेसळ पाहायला मिळत आहे.


कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे शशिकांत मोहिते यांनी देखील या भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली असून या भात पिकात भेसळ आढळून आल्याने या भात पिका पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे नुकसान झाले असून भात पिकाला भाव देखील मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकूणच बदलते हवामान व अनियमित वातावरण तर सुरुवातीला आलेले तोक्तते चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर आता मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलेले समोर आले होते, त्याच्यातून ही बळीराजा सावरत असताना आता कृषी विभागाकडून बियाणांची कोणतीही जात पडताळणीची पाहणी न करता शेतकऱ्यांना ते बियाणे पेरणी साठी देण्यात येत असल्याने देखील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याने कोणाच्या भरवशावर भात पिक घ्यावे. हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला.


कृषी विभागाकडून पीक लागवडीसाठी आम्हा शेतकऱ्यांना नमुना म्हणून देण्यात आले होते. सुरुवातीला पर्पल असे नाव सांगण्यात आले होते. या पिकाला चांगली मान्यता असून किलोला दिडशे रुपये मागणी मिळत आहे. त्यातच हा तांदूळ आयुर्वेदिक असल्याने डायबेटीस सारख्या आजारावर उपयुक्त ठरत आहे. आपल्या तालुक्यात देखील हे पीक शेतकऱ्याने पिकवावे या हेतूने हे पीक कृषी विभागाकडून देण्यात आले होते.परंतु आता पीक लागवड झाल्यानंतर या बियाणांच्यात भेसळ असल्याचे समोर आले असल्याने आमचे खूप नुकसान झाले आहे. - शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका