जव्हार (वार्ताहर) : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच, मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून झेंडूच्या फुलांची जोरात विक्री सुरू आहे. फुलांना प्रति किलो १४० ते १५० रुपये असा भाव मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर दुसरीकडे, भाव वाढूनही ग्राहकांकडून फुलांची खरेदी जोरदार सुरू असल्याने विक्रेते आनंदून गेल्याचे चित्र दिसत आहे.
शारदीय नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच दसरा तथा विजयादशमी. भारतीय संस्कृतीत हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे दसरा सणाला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याला या दिवशी मुहूर्त केला जातो. त्यामुळे या दिवशी झेंडूच्या फुलाला विशेष मागणी असते. विजयादशमीच्या दिवशी घरांना झेंडूच्या फुलांची तोरणे बांधली जातात. वाहनांना झेंडूचे हार घातले जातात. पुजेसाठी झेंडूची फुले वापरली जातात. त्यामुळे झेंडूच्या फुलांना यादिवशी विशेष मागणी असते.
विजयादशमी निमित्त जव्हारची बाजारपेठ यंदा झेंडूच्या फुलांच्या विक्रीसाठी सजली आहे. शहरातील आदिवासी चौक, पचाबती नाका, गांधी चौकात फुल विक्रेत्यांनी झेंडुची फुले आणली आहेत. परंतु, यावर्षी मागील वर्षीपेक्षा झेंडूची फुले प्रति किलो १४० ते १५० अशा भाव असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खर्चाची कात्री बसत आहे. मागील वर्षी झेंडूच्या फुलांचे दर १२० रुपये प्रतिकिलो होतो. ते दर यावर्षी २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. झेंडूची फुले अर्धा किलो ८० ते १०० रुपये तर, पाव किलो झेंडूची फुले ५० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहेत. झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठत दर चढले असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
कोरोना निर्बंधांमुळे अनेक महिन्यांपासून मंदिरे बंदी असल्याने फुलांची मागणी घसरली होती. परंतु, आता मंदिरे खुली झाल्यानंतर फुलांची मागणी भाविकांकडून अचानक वाढली असल्याने फुल विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे फुलांच्या किंमती वाढल्याने झेंडूच्या फुलांचे भाव वाढले आहेत.
मागील वर्षीपेक्षा झेंडूची फुले प्रति किलो १४० ते १५० अशा भाव असल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला खर्चाची कात्री बसत आहे. मागील वर्षी झेंडूच्या फुलांचे दर १२० रुपये प्रतिकिलो होतो. ते दर यावर्षी २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. झेंडूची फुले अर्धा किलो ८० ते १०० रुपये तर, पाव किलो झेंडूची फुले ५० रुपये दराने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहेत. झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने बाजारपेठत दर चढले असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…