दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव

ज्योती जाधव


कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.


घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलाला दर्जानुसार प्रतिकिलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. तसेच, शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे छोट्या झेंडूला ७० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ग्राहकांची अडचण झाली असूनही झेंडूचे फुले खरेदी करत आहे.


बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेशी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केला.


मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच, मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. मात्र, शासनाने मंदिर खुले करण्याचे आदेश दिल्याने आता फुलांची मागणी वाढली असून त्याप्रमाणे किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. मात्र, हे भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह