दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव

ज्योती जाधव


कर्जत : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत बाजारपेठेत फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. भाववाढीनंतरही झेंडूच्या खरेदीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.


घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूच्या फुलाला दर्जानुसार प्रतिकिलोमागे १५० ते २०० रुपये भाव मिळत आहे. तसेच, शेवंतीच्या फुलांना १०० ते १४० रुपये भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे छोट्या झेंडूला ७० ते ८० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ग्राहकांची अडचण झाली असूनही झेंडूचे फुले खरेदी करत आहे.


बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेशी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केला.


मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच, मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. मात्र, शासनाने मंदिर खुले करण्याचे आदेश दिल्याने आता फुलांची मागणी वाढली असून त्याप्रमाणे किंमतीत भरसाठ वाढ झाली आहे. मात्र, हे भाव सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य