आतासारखे निर्णायक सरकार यापूर्वी कधीही नव्हते

  41

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतात आजच्या सारखे निर्णायक सरकार कधीच नव्हते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनचे (आयएसपीए) व्हर्चुअली उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध प्रमुख मुद्द्यांवर भाष्य केले.


२१व्या शतकातील भारत आज ज्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे त्याचा आधार भारताच्या सामर्थ्यावर अतूट विश्वास हा आहे. भारताचे सामर्थ्य जगातल्या कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. या सामर्थ्यापुढे येणाऱ्या प्रत्येक व्यत्ययाला दूर करण्याचे काम आमच्या सरकारचे आहे. आज जेवढे निर्णायक सरकार देशात आहे तेवढे याआधी कधीही नव्हते, असे मोदी म्हणाले.


अंतराळ क्षेत्र आणि अंतराळ तंत्रज्ञानासंदर्भात भारतात ज्या प्रमुख सुधारणा होत आहेत, त्याचा इंडियन स्पेस असोसिएशन हा दुवा आहे. भारतीय स्पेस असोसिएशनच्या स्थापनेसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. जेव्हा आपण अंतराळ सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा आमचा दृष्टिकोन चार खांबांवर आधारित असतो. प्रथम, खाजगी क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण स्वातंत्र्य, दुसरे, सक्षम करणारे म्हणून सरकारची भूमिका, तिसरे, तरुणांना भविष्यासाठी तयार करणे आणि चौथे, अवकाश क्षेत्राला सामान्य माणसाच्या प्रगतीचे साधन म्हणून पाहणे. १३० कोटी देशवासीयांच्या प्रगतीसाठी आपले अंतराळ क्षेत्र हे एक मोठे माध्यम आहे. आपल्यासाठी अंतराळ क्षेत्र म्हणजे, सामान्य माणसासाठी सुधारित मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी!, उद्योजकांसाठी शिपमेंटपासून डिलिव्हरीपर्यंत चांगली गती, असे पंतप्रधानांनी म्हटले. भारताला नवनिर्मितीचे नवीन केंद्र बनवावे लागेल. भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे


ज्यांच्याकडे एंड टू एंड टेक्नॉलॉजी आहे. आम्ही कार्यक्षमतेला ब्रँडचा अविभाज्य भाग बनवले आहे. मग ती अंतराळ संशोधनाची प्रक्रिया असो किंवा अवकाशाचे तंत्रज्ञान. आपल्याला ते सतत शोधायचे आहे. आत्मनिभर भारत’ दृष्टीने आपला देश व्यापक सुधारणांचा साक्षीदार आहे. ही केवळ दृष्टी नाही, तर एक सुविचार आणि एकात्मिक आर्थिक धोरण आहे ज्यामुळे जागतिक विकास सुलभ होत आहे,” असेही मोदींनी यावेळी म्हटले.


एअर इंडियाबाबत घेतलेला निर्णय आपली बांधिलकी आणि गांभीर्य दर्शवतो असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. जिथे गरज नाही तिथे सरकार नियंत्रण संपवणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

अहमदाबाद: एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 या अहमदाबाद - लंडन विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा

Air India To Cut Flights : विमान अपघातानंतर एअर इंडियाने १५% आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली कमी!

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर आणि इराण-इस्रायल संघर्ष सुरू असल्याने, एअर

Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे

इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या आणले, आर्मेनियाच्या रस्त्याने दिल्लीला पोहोचले

नवी दिल्ली: इराणमध्ये अडकलेले ११० भारतीय विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले

केदारनाथच्या मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन