फळेगावात नवरात्रीत घुमतो टाळ मृदूंगांचा नाद



कुणाल म्हात्रे


कल्याण : नवरात्र उत्सव म्हटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावलं. दांडियाच्या रासक्रीडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात गेल्या २८ वर्षांपासून घुमतोय फक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.


नुकतीच घटस्थापना झाली असून, नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईसह, लहानांपासून अबाल वृद्धांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचताना दिसून येतात; परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळते. येथील जरिमरी मित्रमंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदंगाचा आवाज घुमत असून हरिनामाचा जयघोष येथे सुरू आहे.


येथे रोज भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरिनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळ, फळेगाव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे.


या मंडळाची एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते की, यांचे सर्व कार्यकर्ते हे तरुण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडियाऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत असतात. यंदा देखील फळेगावातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे.


आम्हाला आमच्या तरुण मुलांचा अभिमान आहे. गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत राहणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.


 


 

Comments
Add Comment

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या