फळेगावात नवरात्रीत घुमतो टाळ मृदूंगांचा नाद



कुणाल म्हात्रे


कल्याण : नवरात्र उत्सव म्हटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावलं. दांडियाच्या रासक्रीडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात गेल्या २८ वर्षांपासून घुमतोय फक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.


नुकतीच घटस्थापना झाली असून, नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईसह, लहानांपासून अबाल वृद्धांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचताना दिसून येतात; परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळते. येथील जरिमरी मित्रमंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदंगाचा आवाज घुमत असून हरिनामाचा जयघोष येथे सुरू आहे.


येथे रोज भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरिनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळ, फळेगाव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे.


या मंडळाची एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते की, यांचे सर्व कार्यकर्ते हे तरुण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडियाऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत असतात. यंदा देखील फळेगावातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे.


आम्हाला आमच्या तरुण मुलांचा अभिमान आहे. गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत राहणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.


 


 

Comments
Add Comment

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

अचानक मोबाईलचं नेटवर्क गायब झाल्यास 'या' गोष्टी करा

सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. आजच्या काळात एकमेकांशी संपर्क

MHADA Lottery: मुंबईसह ठाण्यात बंपर लॉटरी, पाच हजार घरांची लॉटरी कोणत्या प्राईम लोकेशनवर?

मुंबई: मुंबई-ठाणे या शहरात हक्काचे घर घेणे सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे मात्र याच शहरात तुमचं घर होणारं.

Mumbai Metro: मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आता मेट्रोमध्ये मोबाईल पूर्णपणे बंद राहणार

मुंबई : मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी एक आश्चर्यजणक बातमी समोर आलेली आहे. आता मेट्रोतून प्रवास करताना

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने

Navi Mumbai: शिक्षिकेचं भयंकर कृत्य; दोन विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील