कल्याण (प्रतिनिधी) : जुलैमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील शहर व ग्रामीण परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसानाची झळ पोहोचली आहे. शासनाने कल्याण विभागाच्या पूरग्रस्त नागरिकांना १३ कोटी रुपये वाटपासाठी दिले असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते. किमान पंधरा ते सोळा हजार लोकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले होते. कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून याबाबत तलाठ्यांमार्फत प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरुवात करून पूरग्रस्त नागरिकांकडून बँक अकाउंट तसेच आधार कार्डची झेरॉक्स देण्यात आले होते.
पूरग्रस्त पंचनाम्यात बहुतेक पूरग्रस्तांनकडून संबंधित कागदपत्र तसेच बँक खात्यांचे अकाउंट नंबर चुकीचे दिले असल्याने याबाबत खात्रीशीर चाचपणी करण्यात येत असून पूरग्रस्तांना प्रत्येकी घरटी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात येत्या १५ दिवसात जमा केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…