पूरग्रस्तांच्या खात्यात लवकरच पैसे होणार जमा

कल्याण (प्रतिनिधी) : जुलैमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील शहर व ग्रामीण परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसानाची झळ पोहोचली आहे. शासनाने कल्याण विभागाच्या पूरग्रस्त नागरिकांना १३ कोटी रुपये वाटपासाठी दिले असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते. किमान पंधरा ते सोळा हजार लोकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले होते. कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून याबाबत तलाठ्यांमार्फत प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरुवात करून पूरग्रस्त नागरिकांकडून बँक अकाउंट तसेच आधार कार्डची झेरॉक्स देण्यात आले होते.


पूरग्रस्त पंचनाम्यात बहुतेक पूरग्रस्तांनकडून संबंधित कागदपत्र तसेच बँक खात्यांचे अकाउंट नंबर चुकीचे दिले असल्याने याबाबत खात्रीशीर चाचपणी करण्यात येत असून पूरग्रस्तांना प्रत्येकी घरटी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात येत्या १५ दिवसात जमा केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र तसेच ग्रामीण भागात पूराने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत