हा 'शासकीय इतमामातील' बंद : आशिष शेलार

मुंबई : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्र बंद जनतेवर लादला आहे. त्यामुळे हा 'शासकीय इतमामातील' बंद असून ठाकरे सरकारला जनताही अशाचप्रकारे 'शासकीय इतमामात' निरोप देईल, अशी टीका भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.


आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द खूप प्रिय आहेत. आणि याचा अनुभव महाराष्ट्राची जनता गेले पावणे दोन वर्ष घेत आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात येऊन शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे आणि यातच जनतेवर बंद लादण्यात आला.



हे सुद्धा वाचा - ‘आज वसूली चालू आहे की बंद?’


जनतेचा महाराष्ट्र बंदला विरोध होता, परंतु शासकीय अधिकारी जनतेच्या मनात भिती निर्माण करत होते, तर बेस्टचे महाव्यवस्थापक बंद यशस्वी होण्याच्या कामाला लागले होते. जनतेच्या मनात भिती निर्माण करून महाराष्ट्र बंद लादण्यात आल्यामुळे हा बंद 'शासकीय इतमामातील' बंद असल्याचे आशिष शेलार म्हणाले.

Comments
Add Comment

sand mining : अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी सागरी मंडळाचे अधिकार वाढवले

मुंबई : राज्यातील नद्या आणि खाडीपात्रांतील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी राज्य सरकारने 'वाळू धोरण २०२५' मध्ये

Criminal Public Representatives : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना सन्मानाची गरज नाही!

मुंबई : विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य (आमदार, खासदार) शासकीय कार्यालयात आल्यावर त्यांना उभे राहून अभिवादन

Pandharpur विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’