ऑर्केस्ट्रा कलाकारांना कोरोनाचा फटका

Share

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवात गरब्यावर बंदी असल्याने त्याचा फटका ऑर्केस्ट्रा कलाकारांना बसला आहे. आम्ही पोट कसे भरायचे? असा सवाल हे कलाकार करत आहेत. गरब्यावर बंदी आणल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे.

दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा मोठ्या प्रमाणात होतो. गरब्यादरम्यान ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस असतात. नऊ दिवस विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रादरम्यान या कलाकारांना कामे मिळतात. मात्र गत वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे गरब्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे? असा सवाल हे कलावंत करत आहेत. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे एका वेबसाईटने म्हटले आहे.

राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातल्याने दांडियाप्रेमींसह वस्त्र पुरवणारे व्यावसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक, गरबा नृत्य प्रशिक्षकांमध्ये नाराजी आहे.

कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरब्याला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

2 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

23 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

53 minutes ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

1 hour ago

Emraan Hashmi: इमरान हाश्मीच्या नव्या चित्रपटावर भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…

2 hours ago