ऑर्केस्ट्रा कलाकारांना कोरोनाचा फटका



मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवात गरब्यावर बंदी असल्याने त्याचा फटका ऑर्केस्ट्रा कलाकारांना बसला आहे. आम्ही पोट कसे भरायचे? असा सवाल हे कलाकार करत आहेत. गरब्यावर बंदी आणल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे.


दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा मोठ्या प्रमाणात होतो. गरब्यादरम्यान ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस असतात. नऊ दिवस विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रादरम्यान या कलाकारांना कामे मिळतात. मात्र गत वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे गरब्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे? असा सवाल हे कलावंत करत आहेत. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे एका वेबसाईटने म्हटले आहे.


राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातल्याने दांडियाप्रेमींसह वस्त्र पुरवणारे व्यावसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक, गरबा नृत्य प्रशिक्षकांमध्ये नाराजी आहे.


कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरब्याला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे.

Comments
Add Comment

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’