ऑर्केस्ट्रा कलाकारांना कोरोनाचा फटका



मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सलग दुसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवात गरब्यावर बंदी असल्याने त्याचा फटका ऑर्केस्ट्रा कलाकारांना बसला आहे. आम्ही पोट कसे भरायचे? असा सवाल हे कलाकार करत आहेत. गरब्यावर बंदी आणल्याने गरबा रसिकांचा हिरमोड झाला आहे.


दरवर्षी नवरात्रोत्सवात गरबा मोठ्या प्रमाणात होतो. गरब्यादरम्यान ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस असतात. नऊ दिवस विविध ठिकाणी ऑर्केस्ट्रादरम्यान या कलाकारांना कामे मिळतात. मात्र गत वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे गरब्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही जगायचे कसे? असा सवाल हे कलावंत करत आहेत. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे एका वेबसाईटने म्हटले आहे.


राज्य सरकारने गरब्यावर बंदी घातल्याने दांडियाप्रेमींसह वस्त्र पुरवणारे व्यावसायिक, विद्युत रोषणाई, डीजे वाद्यवृंद, कलावंत, गायक, गरबा नृत्य प्रशिक्षकांमध्ये नाराजी आहे.


कोरोना महामारीचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला बसला आहे. मागील १८ महिन्यांपासून कार्यक्रम होत नसल्याने राज्यभरातील लाखो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत आम्ही जगायचे कसे? असा सवाल कलावंत करत आहेत. नवरात्र उत्सव सुरू आहे. या दिवसांमध्ये ऑर्केस्ट्रा कलाकारांना खूप मागणी असते. मात्र, यंदा राज्य सरकारने गरब्याला परवानगी न दिल्यामुळे या कलाकारांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आलेली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.