मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येने दैनंदिन २० हजारांचा टप्पा पार केला आहे. २० ते ३० टक्के रुग्णसंख्या नियमीत वाढत असून रुग्णांना तत्काळ उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक रुग्णालयात दाखल करा, अशी रुग्णांची मागणी आता पालिका ऐकणार नसून पालिका सांगणार त्याच रुग्णालयात रुग्णांना दाखल व्हावे लागणार आहे. बाधित रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी पालिका पाठवेल त्याच रुग्णालयात रुग्णाला दाखल व्हावे लागणार आहे.
सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी कोरोनाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत असून दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णांवर आधी उपचार करणे गरजेचे आहे.
पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना संपर्कात ठेवले जाणार असून त्यांच्याद्वारे दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी ३५ हजारांहून अधिक खाटा पालिकेने तैनात ठेवल्या आहेत.
RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत बंगळुरुला फलंदाजीला…
पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला. आधी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी…
मुंबई: स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर Samsung Galaxy F14 5G हा…
मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील ६१व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनी…
सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतता व्यक्त…