मुंबई: विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रेयस अय्यर, विराट कोहलीने ठोकलेल्या शतकांच्या जोरावर भारताने मुंबईच्या वानखेडे मैदानावर तब्बल ३९७ धावांचा डोंगर उभा केला.
भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फलंदाजांनी योग्य सिद्ध केला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली. रोहितने जबरदस्त फटकेबाजी करताना ४७ धावा केल्या.
रोहितसोबत फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलने ८० धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने ११७ धावांची खेळी करत संघाला जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.
चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या श्रेयस अय्यरनेही १०५ धावा ठोकल्या. लोकेश राहुल ३९ धावांवर नाबाद राहिला. वानखेडेच्या मैदानावर भारतीय क्रिकेटर्सकडून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. भारताने न्यूझीलंडविरुद्ध जबरदस्त खेळी करताना ३९७ धावा केल्या.
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…