मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगलेल्या विश्वचषक २०२३च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ७० धावांनी विजय मिळवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ बाद ३९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद शमीच्या जबरदस्त ७ विकेटच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला हरवत फायनलमधील आपले स्थान पक्के केले आहे.
विश्वचषकाच्या या सामन्यात मोहम्मद शमी पुन्हा एकदा धावून आला. मोहम्मद शमीने घेतलेल्या सात विकेटच्या जोरावर भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय साकारता आला. त्याने ५७ धावांत ७ विकेट घेतल्या. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर त्याने भारताला विजय मिळवून दिला.
या सामन्यात श्रेयस अय्यरने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने तुफानी फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. अय्यरने ७० बॉलमध्ये १०५ धावांची खेळी केली.
विराट कोहलीने या सामन्यात एकदिवसीय शतकांचे अर्धशतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडीत काढला. कोहलीने या सामन्यात ११३ बॉलमध्ये ११७ धावा केल्या. त्याने या सामन्यात इतिहास रचला.
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…