मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?

Share

मुंबई : म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली असल्याने परीक्षार्थींमध्ये संताप आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा सांगितले. ट्विटरला व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे. दरम्यान परीक्षा रद्द करण्यात आल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.

“प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरभरतीबाबत लक्ष द्यायला वेळ नाही. आठवड्याभरापासून म्हाडाच्या नोकर भरती परिक्षांमध्ये घोटाळा होणार असे स्वत:च सांगत त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?,” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे.

‘महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे. एक एक पैसा गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरीअभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी यांना काहीही देणेघेणे नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी ट्रविटरवर तसेच म्हाडाच्या वेबसाईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून ही परीक्षा आता पुढील वर्षी होणार आहे, अशी माहिती दिली.

“सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे, बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ, त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

Recent Posts

Loksabha Election 2024: मतदानाआधी दिल्ली काँग्रेसला झटका, माजी प्रदेश अध्यक्ष अरविंदर सिंह लवली भाजपमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष…

52 mins ago

Godrej: भावंडांच्या मतभेदातुन गोदरेज कंपनीच्या वाटण्या…

Godrej Family Split: गोदरेज कुटुंबाने 30 एप्रिल रोजी 127 वर्ष जुन्या कंपनीला दोन संस्थांमध्ये विभाजित…

1 hour ago

Saving Plan: दररोज वाचवा केवळ २५० रूपये आणि मिळवा २४ लाख रूपये

मुंबई: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काही ना काही रक्कम वाचवत असतो. तसेच ही रक्कम अशा जागी…

2 hours ago

‘या’ तारखांना लागणार दहावी-बारावीचे निकाल…

CBSC: काही दिवसांपासुन दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहेत. हा प्रकार…

3 hours ago

गुंतवणुकदारांसाठी खुशखबर, NSE देणार एका शेअरवर चार बोनस शेअर!

NSE: नॅशनल स्टॉक एक्सचेंज पात्र गुंतवणुकदारांच्या एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.…

4 hours ago

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

5 hours ago