नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोरोना आणि ओमायक्रॉन रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीमध्ये विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत राजधानीत ४००० हून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या आठवड्यापासून वीकेंड कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री १० ते सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वीकेंड कर्फ्यू लागू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर दिल्ली डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची महत्त्वाची बैठकही पार पडली. त्यात वेगाने वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याता आला. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच यातून सूट दिली जाणार आहे. तर, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीदेखील कार्यालयातील संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात येणार आहे.
संजय राऊतांच्या टीकेवर मनसेचे संदीप देशपांडे यांचे प्रत्युत्तर मुंबई : मनसेने महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा…
संजय राऊतांच्या आरोपांवर शिवसेना व भाजपा नेत्यांचा पलटवार नेमकं प्रकरण काय? मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री…
शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेल्याचा केला होता अनिल देशमुखांनी खळबळजनक दावा…
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे…
मध्यरात्री नेमकं काय घडलं? पुणे : पुण्यात गुन्हेगारीची (Pune Crime) समस्या अत्यंत गंभीर बनत चालली…
बेदम मारहाण...कपड्यांशिवाय घराबाहेर उभं केलं आणि... नवी दिल्ली : आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंक…