गुढीपाडव्याला कडुलिंबाचं सेवन का केलं जातं ? 

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून   हिंदू नववर्षाची सुरुवात होते.

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ यांचं मिश्रण खाण्याची जुनी आणि शास्त्रशुद्ध परंपरा आहे.

आयुष्यातील सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी  स्वीकारण्याचा संदेश या मिश्रणातून मिळतो.

प्रत्येक घरात या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ यांचं मिश्रण असलेल्या आरोग्यदायी प्रसादाचं सेवन केलं जातं.

हा आरोग्यदायी प्रसाद म्हणजे या सणाचं  खास आकर्षण मानलं जातं.

 कडुलिंबाचं सेवन केल्यानं वर्षभर  आरोग्य चांगलं राहत असल्याची मान्यता आहे.