Categories: पालघर

मोखाड्यात पाणीबाणी

Share

मोखाडा : पालघर जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस पडत असणाऱ्या मोखाडा तालुक्यात पाणी साठवणूक नियोजन अभावामुळे पाणीबाणी संकट दरवर्षी डोके वर काढत असते. नागरिकांनाच काय तर जनावरांनादेखील पाणीटंचाई सोसावी लागत आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिमाणशी २० लिटर पाणी उपलब्ध होत असून शासन, प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाला दरवर्षी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे स्वच्छता ठेवण्यासाठी व स्वच्छ राहण्यासाठी किमान ४० लिटर प्रतिमाणसी टँकरद्वारे पाणी मिळावे, अशी मागणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा ही उपाययोजना सुरू केली असून, ३ मार्च १९९९ च्या शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त भागात प्रतिव्यक्ती २० लिटर पाणी, तर गाय, म्हैस, बैल प्रतिजनावर ३५ लिटर व शेळी, मेंढी प्रतिजनावर ३ लिटर पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. त्यातही मिळणाऱ्या पाण्यातून काही पाणी स्वयंपाक व स्वच्छतेसाठी शिल्लक ठेवावे लागत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी मिळावे म्हणून नागरिक विहिरींवर टँकर आल्यानंतर गर्दी करतात. या तुटपुंज्या मिळणाऱ्या पाण्यात आपली तहान भागवायची की स्वच्छता ठेवायची?, असा प्रश्न टंचाईग्रस्त भागातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे, तर शासनाने नव्याने जलजीवन मिशन ही योजना अंमलात आणली असून, त्यामध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, त्यामुळे शासनाच्या पाणीपुरवठा धोरणातच विरोधाभास असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक घरात शौचालय बांधणे बंधनकारक करून स्वच्छता अभियान राबविले असून, घरात शौचालय बांधलेले नसेल, तर सरकारी योजनांचा लाभ नाही, सरकारी घरकुलात शौचालय बांधलेले नसेल, तर लाभार्थ्यांला घराचा हप्ता (अनुदान) दिले जात नाही. मात्र टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यातून प्रतिमाणसी केवळ २० लिटर इतका तुटपुंजा पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे घरोघरी स्वच्छतेच्या सर्व सुविधा असतांनाही हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने स्वच्छता कशी ठेवायची? असा प्रश्न टंचाईग्रस्त भागातील नागरिकांपुढे आहे.

शासनाने जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली असून या योजनेंतर्गत प्रत्येक घरात नळपाणी पुरवठ्याद्वारे प्रतिमाणशी ५५ लीटर पाणी हा निकष निश्चित केला आहे. मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे केवळ २० लीटर इतकेच प्रमाण आहे, त्यामुळे तुटपुंज्या मिळणाऱ्या पाण्यात स्वच्छता ठेवण्यासाठी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांतील नागरिक टँकर येताच जादा पाणी मिळावे म्हणून घरातील सर्व भांडीकुंडी विहिरीवर आणून ती पाण्याने भरण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे.

Recent Posts

RCB vs DC: बंगळुरुच्या बालेकिल्यात दिल्लीचा अस्त, तब्बल ४७ धावांनी दिली शिकस्त…

RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत बंगळुरुला फलंदाजीला…

6 hours ago

PM Modi: पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास

पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला. आधी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी…

6 hours ago

हा आहे Samsungचा सर्वात स्वस्त 5G फोन, ९ हजारांपेक्षा कमी किंमत

मुंबई: स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर Samsung Galaxy F14 5G हा…

8 hours ago

Drinking Water: तुम्ही उभे राहून पाणी पिता का? तर हे जरूर वाचा

मुंबई: हल्ली लोक बाटलीतील पाणी पिण्याला पसंती देतात. उभ्या उभ्या बाटलीतील पाणी संपवता येते. मात्र…

9 hours ago

CSK vs RR : चेपॉकमध्ये चेन्नईने राजस्थानला धुतले, प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामातील ६१व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेटनी…

9 hours ago

Crime : मातृदिनी सासू-सुनेच्या नात्याला काळीमा! मुलाच्या मदतीने केली सुनेची निर्घृण हत्या

सासूने पकडले पाय तर पतीने दाबला गळा नवी दिल्ली : आज जगभरात आईविषयी कृतता व्यक्त…

11 hours ago