Categories: ठाणे

पाणीटंचाईवर विंधन विहिरींची मात्रा…

Share

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यानुसार दर वर्षी पाणीटंचाई आराखडाही तयार करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षीदेखील आराखड्यात पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात आला आहे. दोन टप्प्यात २५२ विंधन विहिरींना जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ६९ विंधन विहिरी खोदण्याची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

ग्रामीण भागातील भविष्यातील पाणीटंचाईची समस्या निवारण्यास मदत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात भातसा, तानसा आणि बारवी अशी मोठी धरणे आहेत. मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांच्या साठ्यातदेखील वाढ झाली होती. त्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे वाढलेली उष्णताव त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे तालुक्यांमधील अनेक गाव-पाड्यांवर पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात दर वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने ऑक्टोंबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यांपासून ते अगदी जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची सोडविण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येत असतो.

त्यानुसार यंदाच्या वर्षी पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात आला असून यामध्ये टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरींचे खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या निवारण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात येत असतो. त्यात यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात ८८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६४ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. ६९ विहिरींच्या खोदाईचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास व पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची संख्यादेखील कमी होण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाई होणार नाही, यासाठी शासन लक्ष ठेवून आहे.

Recent Posts

Jioचा सगळ्यात स्वस्त पोस्टपेड प्लान, मिळणार ५जी डेटा

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स…

34 mins ago

Heart Attack: हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवतील या गोष्टी, दररोज खाल्ल्याने होणार फायदे

मुंबई: आजकाल खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका आढळून येतो. अनेकदा लोक बाहेर तळलेले मसाल्याचे…

1 hour ago

KKR vs MI: सुनील नरेनची ऐतिहासिक कामगिरी, शून्यावर बाद झाल्यानंतर केला रेकॉर्ड

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला शनिवारच्या सामन्यात हरवले. केकेआरने हा सामना १८ धावांनी जिंकला. हा…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ मे २०२४ अनुकूल काळ मेष : शिक्षण, नोकरी-व्यवसायात अनुकूल काळ…

5 hours ago

वृद्धाश्रम ही आजच्या काळाची गरज…

विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती…

5 hours ago

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे आणि लग्नाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. मंगळसुत्रातले…

6 hours ago