ICC T20 World cup : कोहली, पांड्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही!

Share

संजय मांजरेकर यांनी निवडले भारतीय संघाचे खेळाडू

मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) जोरदार चर्चा आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच आयसीसी टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह रिंकू सिंग (Rinku Singh) आणि अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संजय मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालची (Yashaswi Jaiswal) निवड केली आहे.

रोहित आणि यशस्वीनंतर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवडले आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. तर अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याच्यासह आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणाला संधी दिली आहे.

संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव, हर्षित राणा

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले २० संघ

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

Recent Posts

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

5 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

7 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

8 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

9 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

9 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

10 hours ago