मुंबई (प्रतिनिधी) : आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतके आमदार निघून गेले आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वतःच्या गटाचे नाव ‘शिवसेना’ ऐवजी ‘शिल्लक सेना’ करून घ्यावे, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.
निलेश राणे यांनी आणखी एक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, रोड टेस्टची वार्ता करू नका, बदल्यात हॉकी टेस्ट मिळेल. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असे म्हटले होते. त्यावर निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी बंड केल्याने राज्य सरकार धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी आणि राजकीय संकट सातत्याने धक्कादायक आणि लक्षवेधी वळणे घेत आहेत. आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून काहीच दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…
निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…
जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…