U19 WC 2024: ६ महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने

Share

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी संघर्षाने खेळताना पाकिस्तानला चीत केले. सोबतच भारतासोबत फायनल खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले.

आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. ६ महिन्यांच्या आत हे दुसऱ्यांदा घडतेय जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडत आहे.

गेल्या वेळेस पुरुष वर्ल्डकप २०२३मध्ये दोन्ही संघादरम्यान फायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी अंडर १९ संघाकडे आहे.

गेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये भारताचा वरिष्ठ पुरुष गट आणि ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ पुरुष गट यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघादरम्यान हा सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला होता. या साम्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ट्रेविस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४ विकेट गमावत पूर्ण केले होते.

आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघ अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकपचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

Recent Posts

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

16 mins ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

50 mins ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

2 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

4 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

4 hours ago

चालत्या बसमध्ये लागली आग, ८ जणांचा होरपळून मृत्यू

नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…

5 hours ago