कणकवली : यु टर्नचा आता नवीन अर्थ उद्धव ठाकरे. जिथे यू टर्न दिसेल तिथे उद्धव ठाकरे असं उच्चारलं जातं. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक पण दिलेला शब्द पाळला नाही. सोमवारी काहीतरी बोलायचं आणि बुधवारी काहीतरी वेगळंच बोलायचं. यालाच म्हणतात उद्धव ठाकरे आणि यु टर्न. म्हणून यु टर्नची भाषा संजय राजाराम राऊत यांनी करू नये. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. ते महिला सबलीकरणची भाषा कशी करू शकतात? देशाची आणि महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करणे म्हणजे स्वतःच्या मुलांना वाईनची कंपनी उघडून देण्यासारखे नाही. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तरुणांची बेरोजगारी दूर झालेली नाही. फक्त राऊतांच्या दोन मुलींची आणि उद्धव ठाकरेंच्या दोन मुलांची एवढीच बेरोजगारी दूर झालेली आहे. त्यामुळे याला बेरोजगारी मिटवणे म्हणत नाही, असा सणसणीत टोलाही भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. ते कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘इंडी’ आघाडीला सरळ सरळ आपला पराभव दिसू लागला आहे. वातावरण पूर्ण मोदीमय झालेले आहे. संजय राजाराम राऊत ईव्हीएमच्या नावाने नाक रगडत बसले होते. त्या ईव्हीएम वर कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केलेला आहे. भारत देशात निवडणुका या ईव्हीएम वरच होणार आहेत. असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सांगितले आहे. देशाच्या जनतेने ठरवलेले आहे की, पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे आणि एनडीएचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहे.
उबाठा सेनेचा जाहीरनामा जाहीर झाला. ज्याला साधा जाहीरनामा हातात धरता येत नाही ते लोक देशाचे नेतृत्व करण्यासाठी हिम्मत कशी करतात? अशा नेत्यांचे खासदार निवडून देऊन देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेच काय भलं होणार आहे? जे उद्धव ठाकरे स्वतःच्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत, सत्तेसाठी हिंदुत्व पणाला लावलं, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सत्तेच्या लाचारीसाठी गमावून टाकले, त्यांच्या शब्दावर महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.
मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…
मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…
DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…
महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…
मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…
मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…