Categories: ठाणे

स्मार्ट सिटीत वाहतुकीचा खोळंबा

Share

ठाणे (प्रतिनिधी) : स्मार्ट सिटीच्या नावाने डंका वाजवत असलेल्या ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट तर अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहेत. ठाणे शहराच्या दादोजी कोंडदेव परिसरात भूमिगत गटारांचे काम अनेक दिवस सुरू असल्याने त्या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी असते.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर देखील कळवा खाडीवरील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे नागरिकांचा संताप होत आहे. काम संथ गतीने सुरू असून कासवाच्या गतीने कामे होत असताना प्रशासन काय करत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. मागील तीन वर्षांपासून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ठाणेकर सामना करत आहेत.

ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच परिसरात विकासकामांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर खोदकामे सुरू केल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. महापालिकेने तीन हात नाका, देवदयानगर, किसननगर, सावरकरनगर, ढोकाळी, नितीन कंपनी सेवा रस्ता, गोकुळनगर या भागांत रस्ते दुरुस्ती तसेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे एकाच वेळी हाती घेत येथील रस्ते अर्धे किंवा पूर्णत: खोदले आहेत. ही कामे संथगतीने सुरू असून लोकप्रतिनिधी अथवा आयुक्तांच्या आदेशानंतरही या कामांचा वेग वाढत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

ठाणे शहरात पावसाळ्यामध्ये गेल्या वर्षी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. काही ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. हे करत असताना महापालिकेच्या नियोजनाचा सावळागोंधळ जागोजागी दिसू लागला असून यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाचे रस्ते, मार्ग अंशत: अथवा पूर्णपणे बंद होत असल्याने ती कामे आता आवरा, अशा प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.

देवदयानगर येथेही दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या निवासस्थानापासून एक रस्ता खणण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना मुख्य मार्गावर येण्यासाठी उपवन तलावाचा सुमारे दीड किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. सावरकरनगर येथेही कामगार रुग्णालय ते सावरकरनगरच्या दिशेने जाणारा रस्ता खणण्यात आला असून येथील वाहतूक एकेरी मार्गाने होते आहे. या ठिकाणी सायंकाळ होताच मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली असून नितीन कंपनी येथून वागळे इस्टेटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

Recent Posts

KKR vs LSG: एकाना मैदानात कोलकत्ताचा राडा, लखनौला पाजला पराभवाचा काढा…

KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी…

1 hour ago

पेण मधील साई भक्तांचा खासदार सुनिल तटकरेंना पाठिंबा

दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…

2 hours ago

मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…

3 hours ago

राम मंदिरात जाण्यावरुन पक्षाचा विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा…

श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…

4 hours ago

ICC Women’s T20 World Cup महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असणार भारताचे सामने

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…

4 hours ago

खोके, पेट्यांवर जगणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करू नये, नारायण राणेंचा उबाठावर हल्लाबोल…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…

4 hours ago