पर्यटकांना भाऊबीजेच्या दिवशी करता येणार राणीबागेची सैर

Share

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीची सुट्टी लक्षात घेत पर्यटकांच्या सोयीसाठी भायखळा येथील राणी बाग भाऊबीजच्या दिवशी बुधवारी सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार २७ ऑक्टोबरला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद राहील.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘भाऊबीज’, ‘दीपावली पाडवा’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.

मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांकरिता खुले राहणार आहे. जेणेकरून या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल. त्यानुसार बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार हे प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार आहे.

Recent Posts

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

3 hours ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

5 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

6 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

7 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

7 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

7 hours ago