३७ गुंतवणूकदारांना सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा

Share

उल्हासनगर (वार्ताहर) : सदगुरु डेव्हलपर्स ह्या बांधकाम व्यावसायिक कंपनीत गुंतवणूक केलेल्या ३७ गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसत तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाअंती मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात आली नसून त्यांच्यापासून आमच्या जिवाला धोका असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले.

कल्याणमध्ये राहणारे किशोर दादलानी यांचा बेकरीचा व्यवसाय असून उल्हासनगरमध्ये कार्यालय आहे. दादलानी यांच्या ओळखीचे गोविंद मनचंदा आणि ओम मनचंदा ह्या दलालांनी संपर्क साधला. त्यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कल्याण आणि उल्हासनगर भागात नव्याने सुरू होत असलेल्या इमारतीमध्ये कमी रक्कमेत दुकाने, घरे अथवा जादा रक्कम परत देण्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून ३८ जणांनी वेळोवेळी एकूण ५ कोटी ५४ लाख रुपयांचे आठ बांधकाम विकासकांच्या कार्यालयात धनादेश दिले होते. काही महिने गुंतवणूकदारांना परतावाही देण्यात आला. त्यानंतर गुंतवणूकदार परतावा मागण्यासाठी २०१९ ला गेले असता त्या आठही जण गुंतवणूकदारांना दिलेल्या रक्कमेचा परतावा न करताच ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली

Recent Posts

Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…

7 mins ago

Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…

35 mins ago

रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…

3 hours ago

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

6 hours ago

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…

6 hours ago