नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या हिताचे अनेक कल्याणकारी निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत. यामध्ये विशेषत्वाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी प्रशासन विभागास निर्देश दिले आहेत.
महानगरपालिकेतील आठ सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मागील सात वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांच्या वारसांचा प्रश्न यामुळे निकाली निघाला असून आम्हाला न्याय मिळाला अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
अशाच प्रकारे मागील सुमारे २० वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असणारे विविध संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पदोन्नती न झाल्यामुळे लाभापासून वंचित होते. याचा विचार करून आयुक्तांनी सहाय्यक प्लंबर – मदतनीस पदावरून आठ कर्मचाऱ्यांना प्लंबर – फिटर पदावर पदोन्न्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ड्रेसरपदावरून तीन कर्मचाऱ्यांची शस्त्रक्रिया गृहसहाय्यक या पदावर पदोन्नती दिलेली आहे.
त्याचप्रमाणे १०८ लिपिक-टंकलेखक, ९ रेकॉर्ड असिस्टंट, २ रक्तसंक्रमण अधिकारी अशा एकूण ११९ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे
मुंबई: उन्हाळ्यात प्रमाणापेक्षा आल्याचा वापर शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला विस्ताराने सांगणार आहोत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जोरदार टिका यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा मुंबई…
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…