मुंबई : “आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है…..!”, असे ट्वीट करत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात खोचक टीका केली आहे. यासोबतच त्यांनी #संपलेलापक्ष हा हॅशटॅगही वापरला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत आता ठिकठिकाणी मोठमोठे खिंडार पडत आहेत. आमदार, नगरसेवकांनतर आता खासदारांनीही बंडाचा पावित्रा घेतला आहे. यामुळे खडबडून जागे झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र, युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
यानिमित्त आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला कालपासून म्हणजेच ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र आज राष्ट्रीय दुखवटा असल्याने वरळीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
मुरुड( संतोष रांजणकर): मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…
मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा…
तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस…