मुंबई: आपल्याकडे अशी काही फळे असतात जी हंगामी असतात. म्हणजे त्या हंगामात ती खावीत. याच फळांपैकी एक म्हणजे द्राक्षे. खायला गोड, रसभरीत अशी द्राक्षे थंडीच्या दिवसांत येतात.
द्राक्षे प्रत्येकाला आवडतात. रसदार, गोड असे हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडते.
द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. याच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून बचाव करता येतो.
यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. द्राक्षांमुळे डोळ्यांना फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचता येते.
अस्थमाचा धोका कमी करण्याचे काम द्राक्षे करतात.
याच्या सेवनाने फुफ्फुसातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.
द्राक्षांच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.