Swine flu : मुंबईत स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या वाढतेय!

Share

मुंबई : मुंबईत डेंग्यू, लेप्टोचा धोका वाढत असताना ऑगस्टमध्ये पहिल्या वीस दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या (Swine flu) १०० रुग्णांची नोंद झाली आहे. एच१ एन१ रुग्णसंख्येमध्ये सातत्याने होणारी वाढ चिंताजनक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मुंबईकरांमध्ये घसादुखी, सर्दी, खोकला, ताप आणि अनेकदा तीव्र स्वरूपाचा ताप अशी लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे व्हायरल, डेंग्यू किंवा मलेरिया यापैकी कोणत्याही आजाराचे निदान न झाल्यास स्वाइन फ्लूच्या आजारासाठीही निदान चाचण्या करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोरोनाच्या कालावधीमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचा जोर कमी होता. यंदा मात्र पावसाळ्यामध्ये साथींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच स्वाइन फ्लूची रूग्णसंख्या काहीशी वाढताना दिसते आहे.

१ ते २० ऑगस्ट दरम्यानची रुग्णसंख्या

  • मलेरिया – ७०४
  • लेप्टो -२१७
  • डेंग्यू – ४९५
  • गॅस्ट्रो – ४९५
  • कावीळ – ६६०
  • चिकनगुनिया – १४
  • एच१एन१ – १०६
  • जुलै २०२३
  • मलेरिया – ७२१
  • लेप्टो – ४१३
  • डेंग्यू – ६८५
  • गॅस्ट्रो – १७६७
  • कावीळ – १४४
  • चिकनगुनिया – २७
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Tags: swine flu

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

54 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

1 hour ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago