माफिया सरकारचा अंत जवळ आला; किरीट सोमय्या

Share

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या, असे ते म्हणाले.

एकीकडे शिवसेनेमध्ये बंडाळी माजलेली असताना दुसरीकडे भाजपने मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता प्रभाग निहाय बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. या वेळी घाटकोपर पश्चिममधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत सोमय्या म्हणाले की, मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारने केली. मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

11 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

12 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

12 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

13 hours ago