‘कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackaray) यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टोमणे मारुन हल्लाबोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंच्या टोमण्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे? कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीच पुसणार नाहीत आता ते ठसे! ही कसली मुलाखत… ही तर जळजळ, मळमळ आणि अपचनाचे करपट ढेकर. स्वतःचा पक्ष, सरकार न सांभाळायच्या कलंकातून बाहेर पडण्याची धडपड!! असे ट्विट करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या जनमताशी ज्यांनी बेईमानी केली ते इमानदार कसे?
कितीही मुलाखती दिल्या तरी बेईमानीचे पुसणार नाहीत आता ते ठसे!ही कसली मुलाखत…
ही तर जळजळ, मळमळ आणि
अपचनाचे करपट ढेकर
स्वतः चा पक्ष, सरकार न सांभाळ्याच्या “कलंका”तून बाहेर पडण्याची धडपड!!भरलेला डालड्याचा डाबा…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 26, 2023
भरलेल्या डालड्याचा डबा उपयोगाला तरी येतो रिकामा डबा टमरेल ठरतो! एक काळ मुलाखतीतून वंदनीय हिंदुहृहयसम्राट बाळासाहेब ठाकरे डागायचे ते असे काडतूस हल्ली सगळं फडतूस, फडतूस आणि फडतूस!!! असे ट्विट शेलार यांनी केले आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra