मुंबई : बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे (MHADA) नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला दिनांक १५ मार्च, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडाचा विभागीय घटक मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी दि. १४ सप्टेंबर, २०२३ पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानाअंतर्गत अद्यापि गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण १,०८,४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांपैकी ८९,६४८ अर्जदार पात्र ठरले असून, उर्वरीत अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.
गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केले असल्याचा पुरावा दर्शविणारी कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने सादर करता यावीत याकरिता म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लबजवळील समाज मंदिर हॉल येथे तात्पुरते स्वरूपाचे मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून, सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भविल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून, त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचाविण्याकरिता कटिबद्ध आहे, म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गुरुवारी दिली. यापूर्वी कागदपत्रे सादर केलेल्या वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…
दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…